स्वराज्य वार्ता / सुनील गायकवाड
आष्टी: परतुर तालुक्यातील आष्टी परिसरात शुक्रवार दि.०८ रोजी जोरदार झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्याचे सौर ऊर्जा पॅनलच्या साह्याचे मोठे नुकसान झाले असून याचा मोठा फटका शेतकऱ्याला बसला आहे.
अचानक आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी सोलर पॅनल उकळून पडले आहे. काही ठिकाणी पॅनल तुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आष्टी परिसरात झालेल्या जोरदार वाऱ्यामधे दिनकर भाऊराव पोटे या शेतकऱ्यांच्या शेतातील गट नंबर १५ मध्ये लिंबाचे इसडाची दंग तुटून पडली आणि सोलर पॅलन्स चे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा सुरू करण्यात आला असून संबंधित विभागाला आव्हान सादर करण्यात येनार आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






