स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
बहुतांश गावांतील नागरिकांचे स्थलांतर शहरात झाल्याने अधिकचा भार वाढला
परतूर तालुक्यातील आष्टी शहरातील उपकेंदावर वाढत्या ग्राहक संख्येला आवश्यक त्या विद्युत पुरवठा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. शहर व परिसरातील विद्युत ग्राहकांची गरज लक्षात घेता येथील ३३ उपकेंद्राला उपविभागचा दर्जा देण्यात यावा अशी मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी परतूरच्या वतीने जिल्हा कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीत आष्टी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातून पंढरपुर शिर्डी (दिंडी) व पाथरी शेगांव या दोन -महामार्गामुळे परिसरातील बहुतांश गावांतील नागरिकांचे स्थानांतर शहरात झाल्याने ग्राहकांच्या विद्युत पुरवठयावर अधिकचा भार पडत आहे. येथील ३३ उपकेंद्र विद्युत पुरवठा करण्यास असमर्थ ठरत असल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्युत ग्राहकांची गैरसोय होत आहे. आष्टी शहराची लोकसंख्या जवळपास २५ हजार आहे व गावात जवळपास ४ हजार वीज ग्राहक आहेत व परिसरात जवळपास १० हजार ग्राहक आहेत एवढा मोठा भार व मोठा परिसर असतांना या ठिकाणी उपविभाग नाही. अगोदरच उपकेंद्र व त्यातही कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे परिसरातील लोक त्रस्त आहेत. त्यामुळे आष्टी शहर व ग्रामीण स्वतंत्र शाखा करण्यात यावी. आष्टी, लोणी, कोकाटे हदगाव, काहऱ्हाळा, श्रीष्टी अशा पाच शाखांचा मिळून आष्टी येथे उपविभाग बनविण्यात यावा. जेणेकरुन कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल व समस्या कमी होतील. या सोबतच परिसरातील खालील निर्देशीत समस्यांचे सुध्दा निराकरण करण्यात यावे.
परिसरातील गावांचा प्रश्न सुटेल
शहरातील विद्युत पुरवठ्यावर या वाढीव लोकसंख्येचा अधिकचा भार पडतो यामुळे उच्च दाबाने विद्युत पुरवठा देण्यात येथील ३३ उपकेंद्र सक्षम नाही. अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या, अपुरे सुविधा यामुळे ग्राहकांची गैरसोय होते आहे. जर आष्टी, लोणी, कोकाटे हदगाव, कान्हाळा, श्रीष्टी अश्या पाच ३३ शाखांचा मिळून आष्टी येथे उपविभाग केल्यास ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे विद्युत पुरवठा होऊ शकतो. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहकांची गैरसोय निर्माण होणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे रामप्रसाद थोरात यांनी सांगितले
या समस्यांना जावे लागते सामोरे, नागरिक त्रस्त
शहरातील तारा या खुप जुन्या झालेल्या आहेत. त्या जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे तारा तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. रुरबन योजने अंतर्गत शहरात व परिसरात नविन केबल व पोल उभे करण्यात आलेले आहेत. ते त्वरीत कार्यान्वीत करण्यात यावेत, अध्यपिक्षा जास्त रोहीत्रांचे किटकॅट, केबल व बुशींग रॉड खराब झाले असुन एका डी.पी.च्या कामासाठी वारंवार आष्टी शहराचा विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. शहरातील ९ ते १० रोहीत्र अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असुन त्यांच्या बाजुला कसलेही संरक्षण कुंपन नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. आष्टीतील लोणीरोड, बाजार रोड, सातारा रोड या ठिकाणच्या डी. पी. अक्षरशः रोडवर जमीनीवर ठेवलेल्या आहेत. त्याजवळ पावसाचे पाणी साचत आहे. ईदगाह मैदान पाठीमागे लक्ष्मी नगर भाग असुन हा भाग सुरुमगाव फीडरवर आहे. तीथपर्यंत शहर मेन लाईन नेण्यात यावी

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!