माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल दिड तास रास्ता रोको

स्वराज्य वार्ता माजलगाव प्रतिनिधी किसन पवार

 

माजलगाव तेलगाव रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास मंत्र्यासह सत्ताधारी आमदारांना फिरू देणार नाही.. भाई ॲड.नारायण गोले पाटील

माजलगाव शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग 548 सी माजलगाव तेलगाव रस्त्याचे तीन तेरा वाजले असून रस्त्याला प्रचंड भेगा पडल्या आहेत, दररोज रस्त्यावर अपघातात अनेक बळी जात आहेत, या रस्त्यावर आजपर्यंत शेकडो बळी गेलेले असुन शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे, तर शेकडो घरे सदरील रस्त्यावरील अपघाताने उध्वस्त झाले असून अनेक कुटुंबाचा आधार हरवलेला आहे, अक्षरशः हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून शासनाचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असून लोकप्रतिनिधी सदरील रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुशासनास सामान्य जनता कंटाळलेली असून रस्त्यावरील अपघाताची मालिका थांबवण्यासाठी रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १०:००ते ११:३०वा.शेकापच्या वतीने तब्बल दिड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शपा, समाजवादी पार्टी, मौलाना आझाद कलाम युवा मंच, राष्ट्रीय काँग्रेस, डी वाय एफ आय, संभाजी ब्रिगेड शिवसेना उबाठा यांच्यासह विविध पक्ष संघटना सह हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला, तब्बल तीन -तिन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या वेळी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला होता, यावेळी बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी शासनाला माजलगाव तेलगाव रस्त्यावर अजून किती बळी हवे आहेत..? असा संतृप्त सवाल विचारत माजलगाव तेलगाव रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण न झाल्यास सरकारातील मंत्र्यासह सत्ताधारी आमदारांना शेतकरी कामगार पक्ष माजलगाव मतदार संघात फिरू देणार नाही असाही इशारा दिला, या आंदोलनासाठी सलीम खान, नुमान भाई चाऊस, भाई मुंजा पांचाळ, भाई अशोक कुलकर्णी, नवीवोदिन सिद्दिकी, काँग्रेसचे हरिभाऊ सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस शपा चे विश्वांभर तावरे, सतीश बुरंगे, परमेश्वर डाके, तुकाराम नावडकर, नारायण तौर, सिद्धेश्वर काळे, विलास जावळे, सय्यद फारुख, अभिषेक सोळंके राहुल सोळंके पत्रकार नाजेर कुरेशी, भास्कर कांबळे, सचिन पांचाळ, हनुमान पांचाळ, अविनाश गोंडे, दत्ता कांबळे, जयराम राऊत, श्रीराम शेवाळे, श्रीकृष्ण कुरे, बालासाहेब फपाळ, बालासाहेब येवले, डॉ. मनसबदार, राहुल सोनगुडे आदींनी परिश्रम घेतले व शेवटी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने तलाठी रूपचंद आभारे यांनी आंदोलकाचे निवेदन स्वीकारले..

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल