स्वराज्य वार्ता अशोक साबळे
विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर हे सर्व मानवजातीसाठी आदर्श आहेत,म्हणून कित्येक देशांत त्यांना ” knowledge of symbol” म्हणजेच ‘ज्ञानाच प्रतीक’ असे म्हटले जाते,अशा या महामानववाचे भारताच्या विकासात असलेले योगदान जाणून घेणे महत्वाचे आहे,
संविधान निर्मिती सोबतच आधुनिक भारत घडवण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यापक असे योगदान दिले, तेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत
*सक्षम राष्ट्निर्मितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध भूमिकांचे थोडक्यात विश्लेषण :-
१,** बहुजनांच्या हक्कांसाठी लढणारे बहुजन नायक-
शतकानुशतके अस्पृश्यतेचे जीवन जगणारे महार,मातंग, आदिवासी,भटक्या विमुक्त जाती इत्यादी अनेक खालच्या थरातील जातीच्या लोकांना कुठलेच मानवी अधिकार नव्हते, जसे, शिक्षणाचा, चांगल्या राहणीमानाचा, नौकरीचा ,व्यवसायाचा इत्यादी हे सर्व अधिकार सविधानामार्फत मिळवून दिले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी,
स्वतंत्र मतदार संघाची स्थापना करून सर्वांना समान मतदानाचा अधिकार मिळवून दिला जेणेकरून आपण आपला प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे, केवढा हा दुरदृष्टिकोन !
२ ** शैक्षणिक कार्य-: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे 14 वर्षाखालील मुलामुलींना मोफ़त सक्तीचे शिक्षण मिळण्याची तरतूद करण्यात आली, म्हणून आजही अनेक गरीब कुटुंबातील मुले शिक्षणाचा लाभ घेत आहेत, ‘गाव तिथे शाळा’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात सरकारी शाळा स्थापन करण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीच पुढाकार घेतला,
तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून ‘ पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली,आज याच्या 30 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत,छत्रपती संभाजी नगरमधील मिलिंद कॉलेज आणि त्याच्या विविध शाखा आजही कार्यरत आहेत,
3** हिंदुकोडबील- स्त्रियांविषयी चे कायदे म्हणजे हिंदुकोडबील, यात स्त्रियांना नौकरीत समानता,वडीलांच्या संपत्तीत वारसा हक्क, घटस्फोताट,पतीच्या मिळकतीत हक्क इत्यादी, इतकेच काय प्रसूती दरम्यानच्या पगारी सुट्ट्या,स्त्रियांबद्दलइतका भावणीकतेने विचार केलेला पहिला महामानव म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर,
४** शेतकऱ्यांना हिताचे धोरण-:
खोतीप्रथा विरोधी शेतकऱ्यांचे आंदोलन करून ती प्रथा बंद पाडणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे किती दुरदृष्टिकोन ठेवणारे होते हे पुढील कार्यावरून लक्षात येते, जमीनदारी नष्ट करून मोठया प्रमाणात शेतजमिनीचे वाटप करून ज्यांना राहायला स्वतःच्या मालकीची जागा नवती त्यांना ते देऊन ”कसेल त्याची शेती” हे धोरण अवलंबले, शेतकऱ्यांसाठी बी- बियाणे ,खते, कर्ज व कृषिउत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करण्यास हातभार लावनारे डॉ बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचा किती खोलवर विचार करणारे होते हे दिसून येते,
,५ ** जलप्रकल्पांची निर्मिती :-
भविष्याचा विचार करून अनेक जलप्रकल्प राबवणारे डॉ, बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प आणि नर्मदा प्रकल्प इत्यादी अनेक प्रकल्पाचे काम मार्गी लावून अनेक नद्यांना जोडण्याचे काम केले, ते भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठीच,
*६** उर्जाधोरण -;
-; वीजक्षेत्र हे सरकारीच असले पाहिजे, त्याचे खाजगीकरण होऊ नये, कारण खाजगीकरण झाल्यास सामान्य जनतेला वीजदर परवडणार नाही,म्हणून 1948 साली ‘केंद्रीय विद्युत प्राधिकरनाची’ स्थापना करून संपूर्ण भारतीयांना कमीतकमी दरात वीज पुरव्न्याचे कार्य सुरू झाले ते केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमुळेच, !
*७** कामगारांविषयीचे धोरण -:
खाणीत 12 ते 14 तास काम करणारे कामगार व इतर ठिकाणी काम करणारे कामगार यांच्या कामाच्या तासात कमी करून ते केवळ 6 ते 8 तास करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ कामगारांसाठी नव्हे तर सर्वसामान्यांचे सुद्धा उधारकर्ते झालेत,
अशाप्रकारे सक्षम राष्ट्निर्मितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका महत्वाची ठरली आहे,, म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ आधुनिक भारताचे शिल्पकार ‘ असेही म्हटले जाते,
धन्यवाद ! जयभीम
लेखिका
नम्रता अनिल खंदारे( शिक्षिका )
न्यू वंडर इंग्लिश स्कूल, परतुर
जिल्हा – जालना

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!