पाथरी (वार्ताहर): अहमद अन्सारी पाथरी
उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांना उष्ण तापमानाचा फटका सहन करावा लागतो तर दुसरीकडे पिण्यासाठी पाणी मिळत नाही.या प्रश्नी सामाजिक दायीत्वातून वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव नखाते यांचे संकल्पनेतून पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालयात रविवारी वडाच्या झाडाला ठिकठिकाणी मातीच्या पसरट भांड्यात पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आले आहे.हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
याप्रसंगी संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते,प्रशासकीय अधिकारी रमेश सरोदे,अनिल थोरे, प्राचार्य किशन डहाळे,रमेश नखाते, मुख्याध्यापक नवनाथ यादव,शाम शेळके,प्रल्हाद शहारे, प्रकाश रोकडे,शाम मचाले,संजय वाशिंबे,सुरेश नखाते,नारायण जाधव यांची उपस्थिती होती.
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. यात सजीवांसह पक्षी, प्राणीही सुटले नाहीत. शासनस्तरावर उन्हाळ्यात पाणवठे निर्माण केले जातात. मात्र ते पाणवठेच कोरडेठाक पडतात, असे चित्र बघायला मिळते,मात्र प्रत्येकांने आपापल्या परिणे प्राणी व पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वाल्मिकी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये झाडावर पक्षांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवत या राष्ट्रीय कर्तव्यातून पक्ष्यांच्या जीवाचे रक्षण होईल. तेव्हा प्रत्येकानेच राष्ट्रीय संपत्ती जोपासण्यासाठी माणुसकीचा वाटा उचलणे गरजेचं आहे.
▪️आधुनिकतेचा फटका पक्ष्यांना ओझोन वायुचा थर दिवसेंदिवस कमी होत चालल्याने तापमानात वाढ होत आहे. किरण, नेटवर्किंगमुळे पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.वृक्ष,पशू व पक्ष्यांचे महत्त्व जाणून निसर्गाशी नाते जोडण्याचा संदेश संत तुकाराम महाराज यांनी ‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…’’ या अभंगातून मानवाला दिला आहे.दरम्यान मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव नखाते यांचे संकल्पनेतून रविवारी शांताबाई नखाते विद्यालयात पक्षांना तृष्णाप्राप्तीसाठी वडाच्या झाडाला मातीच्या परसट भांड्यात पिण्यासाठी पाणी ठेवले.याप्रसंगी संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते,प्रशासकीय अधिकारी रमेश सरोदे,अनिल थोरे,प्राचार्य किशन डहाळे,रमेश नखाते, मुख्याध्यापक नवनाथ यादव,शाम शेळके,प्रल्हाद शहारे, प्रकाश रोकडे,शाम मचाले,संजय वाशिंबे,सुरेश नखाते,नारायण जाधव आदी..

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!