एक राज्य एक नोंदणी म्हणजे तुम्ही नागपुरात घर घेतलं असेल तर पुण्यातून देखील नोंदणी करु शकता. आधारकार्ड इन्कम टॅक्ससंदर्भात फेसलेस नोंदणी अशी १ मे पासून सुरुवात करतोय.
आॅन वक्फ बोर्ड
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब यांचे विचार सोडले आहेत. मतांचे लांगूलचालन करणे आणि विशिष्ट मतांवर डोळा ठेवत मतदान केलंय.
ऑन ठाकरे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत काँग्रेसचे विचार उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्याचा आणखी एक पुरावा जनतेसमोर ठेवला आहे. एका विशिष्ट समाजाच्या मतांवर डोळा ठेवत हे विरोधी मतदान केले आहे. आज शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत शिवसैनिक आहेत. अनेक लोक पक्ष सोडणार आहेत, मंगळवारी मी पक्ष प्रवेश घेतला आहे. त्यांनी केलेले मतदान हे देशाचा व महाराष्ट्राचा अपमान आहे. जनता त्यांना माफ करणार नाही, जे खासदार निवडून दिले, तिथे लोकांना वाटेल ही चूक झाली. जनता आता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देणार नाही.
ऑन वीज दर
– फडणवीस यांचे आभार
– शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज देऊन सौर ऊर्जेवर त्यांना आणणे
– सौर वाहिनी योजनेमुळे क्रॉस सबसिडी कमी झाली, म्हणून वीजबिल कमी झाले
– ग्राहकांना कमी दरात वीज मिळताना कुणीही विरोध करू नये
– फडणवीस यांचे या योजनेसाठी अभिनंदन
ऑन रेडीरेकनर दर निश्चिती
– मुंबईत फॉर सिझनला जो रेट लागतो तोच शेजाऱ्यालाही लागतो
– झोनिंग नसल्याने हे होतंय
– वर्षाभरात झोनिंग आम्ही करतोय
– जीपीएस मॅपिंग करून सिटीसी द्वारे आम्ही हा निर्णय करतोय
– पुढील वर्षी रेडीरेकनर झोन नुसार येईल
ऑन मुंबईतील बनावट नकाशे
– 165 बनावट नकाशे बनविले गेले
– 465 बांधकामे अनधिकृतपणे बांधले गेले
– आम्ही सर्व नकाशे रद्द केले असुज पालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत
– यात काही अधिकारी सहभागी आहेत
– काहींना या प्रकरणात अटक झाली आहे
ऑन हर्षवर्धन सपकाळ विधान
– काँग्रेस नेत्यांनी सावरकरांचा अपमान करतात
– राहुल गांधींना खुश करण्यासाठी ते बोलतायत
ऑन संजय राऊत
एखाद्या व्यक्तीला पंडू रोग होतो, मग तो काहीही बडबड करतो. भाजप व मोदींचे नाव घेतले की त्यांना विस्मृती होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून हा विचार होतो. चुकीच्या नोंदी झाल्या आहेत, त्यावर शासनाला काम करता येईल. चुकीच्या नोंदणी दुरुस्त होतील. हिंदूंच्या जमिनी आहेत. अल्पसंख्याक व देवस्थान जमिनी आहेत. सर्वेक्षणाचे अधिकार मिळणार आहे. सर्व कायदेशीर होणार आहे. अतिक्रमण व मोघलशाही वक्फ बोर्डाकडून झाली ती दुरुस्ती होईल.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!