मुंबई : ठाण्यातील अष्टपैलू , अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक मंगेश भगवान गायकवाड यांना राज्यस्तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला..सन्मान २९ डिसेंबर रविवारी झाला.. सकाळी १०.३० वा पत्रकार भवन मुंबई येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले. सदर कार्यक्रम सलमा.एन्. खान आयोजित तथा ऊपस्थित मान्यवर अभिनेत्री सौ. नयनाताई आपटे, कर्नल रविंद्रजी त्रिपाठी, डॉ.शुभदा निल, डॉ.सौ.सादिका नवाब, मा.अभंष कुमार, मा. अल्ताफ दादासाहेब शेख. आणि कार्यक्रमाचे आयोजक सर्वेसर्वा सन्माननीय एन्. डी.खान अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. मंगेश यांनी गेल्या आठ ते नऊ वर्षात अनेक नाटकं, मालिका, सिनेमा, लघुपट यात अभिनय व तसेच अल्बम साँग याचे दिग्दर्शन केले यांचा आढावा घेऊन व यात दखल घेऊन अशा या कार्याबदल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मला ही हा पुरस्कार मिळाला आहे तर अजून नवीन कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे तर नेहमी कला, साहित्य,आणि अनेक समाज सेवा घडो हीच देवा चरणी प्रार्थना आहे. असे अभिनेता मंगेश गायकवाड म्हणाले आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!