यू. आर. अनंतमूर्ती

(जन्म: २१ डिसेंबर १९३२ – मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)
भारतीय साहित्यविश्वात एक अमूल्य रत्न म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे यू. आर. अनंतमूर्ती. कन्नड साहित्याला जागतिक स्तरावर विशेष स्थान मिळवून देणाऱ्या अनंतमूर्तींनी आपल्या लेखणीच्या जोरावर समाजातील समस्यांना आणि मानवी जीवनाच्या गुंतागुंतींना अचूक शब्दांत पकडले. त्यांचे लेखन केवळ कथा नसून, विचार, तत्त्वज्ञान, आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित गहन चिंतन आहेत. त्यांचे पूर्ण नाव उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती होते. त्यांच्या जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. अनंतमूर्तींच्या लेखनाची खरी ताकद त्यांचं वास्तववादी दृष्टिकोन आणि मानवी भावनांचं सूक्ष्म वर्णन होतं. त्यांच्या कादंबऱ्या आणि कथांनी कन्नड साहित्याला नवा आयाम दिला.
त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरूवात दूरवासपुरा मधील एका संस्कृत विद्यालयातून केली होती. त्यानंतर त्यांनी इंग्रजी आणि तुलनात्मक साहित्य या संबंधातील शिक्षण म्हैसूर आणि बर्मिंघम (इंग्लंड) येथून घेतले. १९६६ मध्ये त्यांनी बर्मिंघम विश्वविद्यालयातून ‘राजकारण आणि साहित्य’ या विषयावर शोधप्रबंध सादर करून पी. एच. डी. ही पदवी प्राप्त केली होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अनंतमूर्ती यांनी म्हैसूर विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली तसेच ते केरळमधील महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरूही राहिले होते. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘एन्देन्दु मुगियद कथे’ प्रकाशित झाला. समकालीन स्थितीवर आपल्या बहुआयामी अभिजात दृष्टीने, तसेच सूक्ष्म अध्यात्मिक चेतनेच्या माध्यमातून अनंतमूर्ती यांनी आधुनिक जीवनातील अंतर्विरोध आणि तणाव यावर मौलिक चिंतन आणि संशोधन केले आहे. अनंतमूर्ती यांनी ‘एन्देन्दु मुगियद कथे’, ‘प्रश्ने’, ‘मौनी’ , ‘आकाश मट्टू बेक्कू’ , ‘एरडु दशकदा कथेगळु’ ,‘संस्कार’ , ‘भारतीपुरा’, ‘अवस्थे’ , ‘भव’, ‘मिथुन’,‘सन्निवेश’, ‘प्रज्ञे मत्तु परिसर’, ‘पूर्वापार’ इत्यादी पुस्तके लिहिली.
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे अनंतमूर्ती हे कन्नडमधील सहावे व्यक्ती आहेत. ज्ञानपीठ हा देशातील अत्यंत प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार आहे. ते १९९२ मध्ये नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष झाले तसेच १९९३ मध्ये साहित्य अकादमीचे अध्यक्ष बनले व जेएनयूसह अनेक प्रसिद्ध संस्थांमध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर झाले.
अनंतमूर्ती यांना अनेक पुरस्कारांनी, सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यात पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कार यांचा समावेश आहे. २२ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.
यू. आर. अनंतमूर्ती हे केवळ साहित्यिक नव्हते, तर एक विचारमूर्ती होते, ज्यांनी शब्दांच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवला. त्यांची लेखणी आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहतील.
यू. आर. अनंतमूर्ती
यांना जयंती निमित
विनम्र अभिवादन!
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल