स्वराज्य वार्ता / प्रतिनिधी :सुनील गायकवाड,
आष्टी : सेंद्रिय शेती दिवसेदिवस रासायनिक व हानिकारक कीटकनाश्याचा खते अति वापराल्यामुळे शेताच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी घटक व मानवाच्या जीवाला होणारा नुकसान वाचवण्यासाठी नवभारत फर्टीलावंझर चे कृषी अधिकारी सतीश पवार यांनी रायगव्हाण,ता, परतुर,जिल्हा जालना, येथील शेतकऱ्यांनाजैविक शेती व सेंद्रिय शेती बद्दल माहिती दिली. खरीप हंगामातील पिकांसाठी कापूस या पिकावरील पडणाऱ्या पांढऱ्या रसशोक कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रथम जैविक औषधाचा वापर करावा त्यामुळे रसशोषक किडांचा प्रादुर्भात होणार नाही. अति रासायनिक खताचा अति वापर कमी करून जैविक खताचा वापर वाढला पाहिजे त्यामुळे जमिनीतील मित्र कीटकांची संख्या ही वाढते त्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते त्यामुळे पिकाचे उत्पादन ही वाढते खरीप पिकांचे कापूस व सोयाबीन पिकाबद्दल ही (सतीश पवार ) यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात गावातील शेतकरी वर्गातून केशव कडपे, गोरख गोटे, आसाराम नवल, इंद्रजीत पोटे, तसेच कंपनीच्या वतीने दत्ता सोळंके सहभागी होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!