स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतुर प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील परतुर तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बरकुले ,मंठा तालुकाध्यक्ष गणेशराव घारे ,अंबड तालुका अध्यक्ष सतीशराव ढवळे , घनसावंगी तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव कंटुले ,भोकरदन तालुका अध्यक्ष सुरेशराव सपाटे, जाफराबाद तालुका अध्यक्ष दत्तू अंभोरे पाटील ,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रमेश पाईकराव यांनी सर्व लोकांनी अजित दादा पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणीचे साकडे घातले ते म्हणजे मा. श्री. अरविंद अण्णा चव्हाण यांना विधानसभेचे तिकीट मिळावे व अरविंदराव चव्हाण यांना आमदार करण्याची ताकद सर्व जिल्ह्यातून लावण्यात येईल .असे शब्द देऊन दादा पवार यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी उपस्थित मा. श्री .शिवाजीराव गर्जे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयीन सचिव, सुरजराव चव्हाण महाराष्ट्र महाराष्ट्र युवक प्रदेशअध्यक्ष चंद्रकांतजी कारके राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष जालना, विठ्ठलराव बरकुले, तालुकाध्यक्ष परतूर, डॉ.प्रमोद जगताप शहर अध्यक्ष परतुर व जालना जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






