स्वराज्य वार्ता / राम राठोड
<br>आष्टी/प्रतिनीधी/ आष्टी येथे भगवान बाबा नगर, दत्त नगर, पळशी व आनंदगाव सह शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या गावांना शेगाव – पंढरपूर रस्त्यालां जोडला (जांगाशन) नसल्याने या गावांच्या जनता उलट्या दिशेने जावें लागते या प्रकारामुळे अनेक अपघात झाले आहेत. पुढील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी जगशेन करणे आवश्यक आहे. या बाबत प्रशनास जिल्हा अधिकारी व संबंधित दिंडी महामार्गाचे अधिकाऱ्यांना दिनांक ७ जुलै २०२४ रोजी कळविले होते. परंतू प्राशन व जालना रस्ते विकास महामंडळाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहेत असे दिसत असल्याने गावकऱ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:३० वा. रास्ता रोको जगसेन (रास्ता जोडे) करेपर्यंत करण्यात येणार आहे.तरी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आंदोलन करते सुग्रीव मुंडे, प्रवीण चौरे, रमेश (बंडू) नांगरे,हनुमान वाघमारे, कल्याण कारभारी, रामा दुरे यांनी हजोरोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
—- “चलो “. ” चलो “. “चलो “—-
दिनांक – ०९ सप्टेंबर २०२४ ठिकाण -आष्टी कॅम्प येथे शेगांव – पंढरपूर दिंडी महामार्ग वेळ -११:३० वा. – सुग्रीव मुंडे – प्रमुख आंदोलनकर्ते – ९४२१२८१०७८ भगवान बाबा नगर, दत्त नगर, पळशी व आनंदगाव

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!