स्वराज्य वार्ता/ पी.डी सोळंके
आष्टी : परतूर तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथे रविवार या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि दुसऱ्या दिवशी पोळा अस शेतकऱ्याचा सण असल्यामुळे तो सण या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना दुःखात साजरा करावा लागला एकीकडे पाहिले गेले तर यावर्षी शेतकऱ्यांनी शेतीला खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला असून रविवार हा दिवस शेतकऱ्यांसाठी फार दुःखाचा डोंगर कोसळून गेला आहे शेतकऱ्याची त्याच्या पिकाकडे पाहण्याची ही क्षमता शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही एकीकडे पाहिले गेले तर शासन शेतकऱ्याला हमीभावामध्ये त्या शेतकऱ्याची लचके तोडतात त्यामध्ये निसर्गही त्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळून गेला आहे माझी शासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही त्यांना जास्तीत जास्त मदत करा आणि कुठेतरी पुण्याचे वाटेकरी व्हा एवढीच माझी विनंती आहे प्रहार जिल्हा उपाध्यक्ष हनुमान गुंजाळ पाटील यांनी व्यक्त केले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!