स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
टिटवाळा मांडा पश्चिम येथे आझाद नगर येथे पावसाळा सुरू होतोय ना होतेय तर चेंबरचे गटाराचे पाणी नागरी वस्तीत शिरू लागले आहे. आझाद नगर येथील अनाधिकृत बांधकामामुळे सदर समस्या उद्भवले आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. समाज सेवक राजेंद्र जाधव यांच्या म्हणण्यानुसार आजाद नगर येथे ड्रेनेज लाईन वर चाळीचे बांधकाम झाले आहे सदर बांधकामामुळे पाण्याचे मल्ल:निसरण करणारे चेंबर रूम खाली दबले असून दुर्गंधीयुक्त सांडपाणी हे आजाद नगर रहिवाशी चाळीच्या येण्या-जाण्याच्या मार्गीकेवर साचले आहे तसेच पूर्ण वस्तीमध्ये वाहत आहे. नागरिकांना डेंगू मलेरिया सारखे आजार होण्याची संभावना आहे लोकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्रेनेज लाईन वरील अतिक्रमण हटवल्या शिवाय सदर समस्येचे निराकरण होणार नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका सांडपाणी, मल्ल:निसरण विभाग,आरोग्य विभाग सदर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे अशी नागरिकांमध्ये ओरड आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!