स्वराज्य वार्ता राम राठोड
आष्टी जि.जालना श्री शांतिनाथ दि जैन मंदिरात सकल जैन समाजाच्या वतीने विश्वनवकार दिन साजरा केला. (दि.९ एप्रिल २०२५) सकाळी ७ ते ९-36 पर्यंत नमोकार महामंत्र जाप दिला – विश्वशांति सोहार्द व सकारात्मक उर्जा प्राप्ती साठी पूर्ण विश्वात साजरा केला गेला. महावीर जयंती (जन्मकल्याणक) उत्साहात साजरे आष्टी ता. परतूर येथील श्री शांतिनाथ दि.जैन मंदिरात सकाळी ७ वा. अध्यक्ष प्रकाश मेहेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. ७.३० ते ९ पर्यंत भ.महावीराचा महामस्तकाभिषेक केला. इंद्राचा मान अक्षय कोठेकर यांना मिळला, नंतर प्रतिमा पाळण्यात ठेवून जन्मोत्सव-नामकरण विधी झाला. महिल मंडळाने पाळणा , अभंग, भजन व आरती चा कार्यक्रम संपन्न केला व श्री वर्धमान विधान केले व रात्री दिप प्रज्वलन झाले. यावेळी-सकल जैन समाज व महिला मंडळ उपस्थित होते. व प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी दिनेश मेहेत्रे, आकाश मेहेत्रे कुलभूषण कोठेकर महावीर काळे, व पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी परिश्वम घेतले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!