स्वराज्य वार्ता/ प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
मानवत शहरातील एसबीआय मार्केट शाखा बँकेचे एटीएम मशिन खुप दिवसापासून बंद असल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सणासुदीच्या दिवसांत एटीएम मशिन बंद असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक ग्राहकांना वेळेवर पैसे मिळत नाही. बँकेत व ग्राहक सेवा केंद्रामध्ये खुप गर्दी होत आहे त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असून, ग्राहक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहेत.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!