डॉ. विष्णू भिकाजी कोलते

आपल्या मराठी संताचे सामजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना लेखनाच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांनी महानुभावीय साहित्याची गूढ लिपी उकलून, महानुभावीय साहित्याचं संशोधन केलं.खामगाव येथे ते माध्यमिक शिक्षणासाठी असताना तेथील वास्तव्य त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे ठरले. शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब गणेश गोरे यांनी त्यांना प्राचीन मराठी कवितेची गोडी लावली. कविता वाचता वाचता विष्णू स्वत: कविता करू लागले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणात नागपूर विद्यापीठाचे बी.ए. आणि एम्. ए. च्या परीक्षेत मराठीत सर्वप्रथम आल्याबद्दल बेहरे पारितोषिक व सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांतील प्रथम क्रमांकाबद्दल मलक सुवर्णपदक मिळाले. १९३१ साली ते एल्ए‌ल्‌. बी. ही झाले. तेव्हापासून १९६६ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते सरकारी महाविद्यालयांतून मराठीचे प्राध्यापक होते. १९४८ मध्ये महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानासंबंधी लिहिलेल्या प्रबंधावर त्यांस डॉक्टरेट मिळाली.
पुढे चालून ते अमरावतीतील किंग एडवर्ड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले याच काळात महानुभाव पंथियांच्या वाङ्मयाकडे त्यांचे मन आकर्षित झाले. ते साहित्य मराठी वाङ्मयाच्या प्रमुख प्रवाहात आणावे, असे त्यांना वाटू लागले. त्या दृष्टीने त्या साहित्याचा अभ्यास सुरू झाला. त्यांनी संशोधन, संपादन हेही क्षेत्र स्वीकारले.
महानुभाव पंथाचे काही साहित्य कूटलिपींमध्ये असल्यामुळे ते सर्वसामान्यांना वाचता येण्यासारखा नव्हतं. त्यामुळे त्या पंथाचे महंत त्यातच समाधान मानीत कोलते यांनी या कूटलिपी अभ्यासली. महानुभावांच्या अनेक ग्रंथांचे चिकित्सक संपादन केले. उदा. भास्कर भट्ट बोरीकर विरचित ‘उद्धवगीता’, ‘स्थानपोथी’, नरेंद्र विरचित ‘रुक्मिणी स्वयंवर’, महाई भट्ट संकलित श्री गोविंदप्रभू चरित्र इत्यादी अशा एकूण पंधरा महानुभावीय ग्रंथांचे विष्णू कोलते यांनी संपादन केले.
महानुभाव तत्त्वज्ञानावर प्रबंध लिहून त्यांनी ‘आचार्य’ ही सन्मानाची उपाधी मिळवली.
त्यांनी प्राचीन भारतीय इतिहासासंबंधीचे सुमारे ३०-३२ लेख लिहिले. महाराष्ट्राच्या विविध भागांत सापडलेले शिलालेख, ताम्रपट यांचे त्यांनी वाचन केले. त्यांचे विवरण, स्पष्टीकरण केले. हे लेख संस्कृत, प्राकृत, कानडी, मराठी या भाषांमधील होते.
मराठी संतांचे सामाजिक कार्य, लव्हाळी, स्वस्तिक,
मूर्तिप्रकाश, साहित्य संचार, प्राचीन मराठी साहित्य संशोधन, मराठी अस्मितेचा शोध, स्नेहबंध, गिरिपर्ण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे १९६७ सालच्या भोपाळ साहित्य संमेलनाचे अध्यक्षही ते होते. त्यांच्या कार्यासाठी १९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. अशा या महानुभाव साहित्याचा गाढा अभ्यास असणाऱ्या डॉ. विष्णू कोलते यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल