स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे चोरट्या वाहतुकीद्वारे आष्टी येथे गुटखा येतो आणि त्याची सर्रासपणे किराणा दुकान टपऱ्यांवर विक्री होते. आष्टी येथे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे. परंतु, ती कागदावरच आहे.
प्रत्यक्षात प्रत्येक किराणा दुकान टपऱ्यांवर गुटखा सर्रासपणे मिळतो व तोदेखील चढ्या दराने पण महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे, परंतु इतर राज्यांमध्ये ती नाही. त्यामुळे चोरट्या वाहतुकीद्वारे महाराष्ट्रात गुटखा येतो आणि त्याची सर्रासपणे किराणा दुकान टपऱ्यांवर विक्री होते. खासकरून पान-मसाल्याच्या नावाखाली जर्दा वेगळी करून पोलिसांच्या मदतीने ही विक्री होते, परंतु जर्दा आणि पानमसाला एकत्र केल्यास तो गुटखाच तयार होतो. याचा विळखा पूर्ण आष्टी शहर आणि परतूर तालुक्यात पडला आहे. याबाबत पोलिसांनी गुटखा माफियांवर कारवाया न करता तडजोड करून हप्ते घेऊन आष्टी शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केली जात आहे मात्र, त्या नावापुरत्याच कार्यवाह्या होताना दिसत आहे. प्रत्यक्षात खुले आम गुटखा विक्री केली जात आहे.
या गुटख्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. तसेच अन्ननलिकेचा अल्सर व कॅन्सरही होण्याचा धोका वाढतो. मात्र, तरीही अनेक कंपन्यांचा गुटखा आष्टी शहरात व ग्रामीण भागात विक्री केला जातो. गुटख्याला राज्यातून बंदी घातली आहे मात्र आष्टी पोलिसांच्या व तालुका अन्न औषधी विभागाकडून अर्थ पूर्ण काना डोळा केला जात आहे. फरक एवढाच झाला की तो पूर्वी किराणा दुकान व टपऱ्यांवर माळांच्या स्वरूपात असायचा तसा आता दिसत नाही. आता कागदांमध्ये गुंडाळलेला तर कधी पिशव्यांमध्ये किराणा दुकान व टपरीचालक ठेवताना दिसतात. व याची वाहतूक खुले आम मोटारसायकल वरून आष्टी शहर व परिसरात केली जात आहे पण आष्टी येथील पोलिस आपली ठराविक रक्कम हप्ता स्वरूपात घेतात व या गुटख्याची सर्रास विक्री करणाऱ्या माफियाला पाठीशी घालतात.
तर गुटख्याच्या पाकिटावरील किमतीपेक्षा दीडपट ते दुप्पट जादा दराने त्याची विक्री केली जाते. कारण, गुटखा ग्राहकांपर्यंत येईपर्यंत विविध यंत्रणांना हप्ता द्यावा लागतो म्हणजे मलिदा ही बाब त्याला कारणीभूत आहे. याचे कारखाने हे महाराष्ट्राबाहेर असल्याने त्याची वाहतूक शेकडो किलोमीटर करण्यात येते. याच कारण म्हणजे कर्तव्य दक्ष महाराष्ट्र पोलिस यांना आर्थिक लालुच दिली की ते काहीही करू शकतात. राज्यात गुटखा उत्पादन आणि खाण्याला बंदी असली तरी शेजारच्या राज्यात बंदी नाही. तेथून गुटख्याची स्मगलिंग होते. ती रोखण्यासाठी पोलिस आणि एफडीए कारवाई करत नाही. आता भारतीय दंडविधान संहिता कलम २७२ (विक्रीसाठी असलेल्या खाद्यपदार्थात भेसळ करणे) आणि २७३ (अपायकारक खाद्यपदार्थांची विक्री) हे दोन्ही कायदे आहेत. पण लाच खोर अधिकारी व स्थानिक पोलीस यांच्या हप्तेखोरीला आला कधी बसणार आता आष्टी नाही कारभारी मग करणार कोण कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी याकडे लक्ष देतील का ? हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!