स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी प्रतिनिधी : परतुर तालुक्यातील पिंपळी धामणगाव आज दिनांक 12/03/2026 रोजी परतूर तालुक्यातील मौजे पिंपळी धामणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज विज्ञान प्रयोग प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, संशोधनाची वृत्ती विकसित व्हावी आणि प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञान समजून घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पांडुरंग काळे हे उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रल्हाद लताबाई कचरु वाहुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढवण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन व आयोजन शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. राऊत सर, रत्नपारखी सर, मोरे सर, थेटे सर, खिल्लारे सर आणि पौळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विविध प्रयोग सादर करण्यासाठी प्रोत्साहित केले.
शाळेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग, मॉडेल्स आणि प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचत, पाणी संवर्धन, पर्यावरण संरक्षण, विज्ञानातील सोपे प्रयोग आणि दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा वापर यांसारख्या विषयांवर आकर्षक प्रयोग मांडले. या प्रयोगांमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अभ्यासातील जिज्ञासा स्पष्टपणे दिसून आली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतुक करत त्यांना पुढील शिक्षणात विज्ञान क्षेत्रात मोठे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या प्रयोगांचे स्पष्टीकरण देत विज्ञानाविषयीची समज दाखवली.
या विज्ञान प्रयोग प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल उत्सुकता वाढली असून शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. कार्यक्रमामुळे शाळेत शैक्षणिक वातावरण अधिक बळकट झाले असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






