स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
परभणीती(जि प्र) वर्ग तीन चे कर्मचारी व वर्ग चार चे कर्मचाऱ्यांना त्या त्यांच्या मुळ पदावर ठेवण्याची मागणी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या कडे लोकश्रेय मित्र मंडळा च्या वतिने करण्यात आली आहे या निवेदनावर लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूज चे पञकार सलीम इनामदार यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली आहे
मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना इतर महत्त्वाच्या ठिकाणी देण्यात आले कसे काय बदल करण्यात आले आहे उदाहरणात शहरा मध्ये डेंगु मच्छर या सारख्या आजार वाढल्यास त्यावर कोणते कर्मचारी वर जवाबदारी सोपविण्यात येइल किंवा सोपविण्यात आली आहे का?सध्या पावसाळा सुरु आहे
अनेक कर्मचारी 20ते 25 वर्षांपासून ठान मांडुन बसलेल्यांचा विचार आयुक्त हे करणार आहे का नाही अशा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतवत असल्याने कर्मचारीवर्ग नारज दिसत असल्याचे चिञ दिसत आहे वर्ग चार चे कर्मचारी वर्ग तीन च्या जागी ठान माडुन काम करत असुन यांच्या कडे फार महत्त्वाची कामे असल्याने उदाः बांधकाम नगर रचना वसुली व इतर कामे वर्षांनुवर्षे वर्ग 4 चे कर्मचारी वर्ग 3 चे कामे करतात त्यांचे मुळ पदावर बदल होत नाही याचे कारण काय समाजेनासे झाले तसेच वर्ग 3 चे कर्मचारी काही विभाग असे आहे की रुजु झाले की ते कर्मचारी एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांच्या कामाचां खेळखंडोबा होत आहे वर्ग 3 च्या मोजक्या कर्मचाऱ्यांना 5 -5 विभागाचा चार्ज दिला जाते याचे कारण काय?मोजक्या लिपीकांचे जाणीवपूर्वक या विभागातुन त्या विभागात बदल्या करतात ठांड माडुन बसलेल्यांचे का बसल्या होत नाही असा प्रश्न कर्मचारीवर्ग व लोकश्रेय मित्र मंडळा ला पडला आहे अत्यंत महत्वाचे आयुक्त धैर्यशील जाधव यांचे सहाय्यक (p a) हे देखील वर्ग (4) चार चे कर्मचारी आहे हे काय करभार महा पालिकेत चालत आहे असा प्रश्न पञकार सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमाकडे व्यक्त केला आहे या प्रकरणी आयुक्त यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा लोकश्रेय हे लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सलीम इनामदार यांनी सांगीतले आहे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






