स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
राष्ट्रसंत फाउंडेशन परभणी च्या वतीने मा रघुनाथ जी गावडे साहेब जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मार्फत केंद्रीय कृषि किसान कल्याण ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण साहेब
महाराष्ट्र राज्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे साहेब
यांच्याकडे प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2025 – 26 चा अर्ज भरण्यासाठी वाढीव केलेली पैसे घे तात्काळ कमी करणे एक रुपयात पहिले जसे होते तसेच ठेवण्यात यावे
दुसरी पिक विमा योजना ही पहिली एक रुपया मध्येच भरण्याची सवलत होती ती तशीच ठेवावी
या संदर्भात (प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 शासनाने राबविण्यासाठी शासन निर्णय दि. 24 जुन 2025 अन्वये जिल्हामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी या विमा कंपनीकडुन राबविण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्यशासनाने कप अॅन्ड कॅप मॉडेलनुसार (80-110) बीड पॅटर्ननुसार राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे निर्णय रद्द करा पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगामा 24 25 चा फक्त एक रुपया मध्येच भरल्या जात होता पण मात्र आता हीच योजना 2025 व 26 साठी याच्यात वाढ करण्यात आली व पैसे भरूनच पिक विमा मिळणार आहे जसे होते तसेच राहू द्यावे ही मागणी राष्ट्रीय शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर व
राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने निवेदनाद्वारे प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 शासनाने राबविण्यासाठी शासन निर्णय दि. 24 जुन 2025 अन्वये जिल्हामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी या विमा कंपनीकडुन राबविण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्यशासनाने कप अॅन्ड कॅप मॉडेलनुसार (80-110) बीड पॅटर्ननुसार राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. म्हणून प्रशासनाने हे निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न करावा प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामा 2025 26 चा अशा पद्धतीचे खाली दिलेल्या ची वाढ करण्यात आलेली आहे
सर्व जिल्ह्यासाठी खालील पिकांचा विमा शेतकऱ्यांना घेता येईल व त्यासाठी लागणार विमा हप्ता दर प्रति हेक्टरी खरीप ज्वारी – रू.81.25/-, बाजरी 80/-, सोयाबीन रू.1160/-, मुग रु. 68.75/-उडीद – रू.62.50/-, तुर रू.900/-, कापुस रू.1050/- या प्रमाणे आहे. वरील निर्णय हे सर्व रद्द करण्यात यावे कारण प्रशासनाने असे निर्णय घेतले आहेत हा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाही व त्याचे पहिले जसे होते तसेच ठेवला तरीपण प्रशासनाला पहिला प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामा 2025 26 हे भरण्यासाठी एक रुपया मध्ये भरण्यात यावं जसे पहिले चालू होते तसेच ठेवावे हे शेतकऱ्यांना परवडणार नाही म्हणून प्रशासनाने तात्काळ पहिला जसा एक रुपयात जसा भरला जात होता तसाच ठेवावा नाहीतर जर पीक विम्याचे अशा प्रकारचे रेट आर्थिक मूल्य जर राहिले तर येणारा काळ जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शेतकरी बांधवांच्या वतीने म्हणून प्रशासनाने पिक विमा भरण्यासाठी जी आर्थिक वाढीव केलेली तात्काळ कमी करा व 0 रुपयात पिक विमा भरण्याची योजना अमलात आणावी ही नम्र विनंती
निवेदन कर्ते
शेतकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर (संस्थापक अध्यक्ष राष्ट्र जन किसान फाउंडेशन परभणी महाराष्ट्र)
२)डॉ.गोविंद कामटे
३) अँड निवृत्ती कदम आधी जरांच्या स्वाक्षऱ्या आहेत अशी यांच्याकडे पाठपुरवठा कराप्रतिलिपी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री कृषी राज्यमंत्री केंद्रीय कृषिमंत्री केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृषी विकास महामंडळ केंद्र व राज्य यांच्याकडे अर्ज करण्यात आला अशी माहिती राष्ट्र जन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय शेतकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!