तालुका उपाध्यक्ष पदी ऍड. सुरेश काळे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी संभाजी घनवट.
प्रतिनिधी :- परतूर तालुक्यात समाजसेवा, राष्ट्रभक्ती, आणि संघटनात्मक बांधणी यांचा एक ठोस चेहरा म्हणून सावता सुभाषराव काळे यांची ओळख निर्माण झाली आहे. बालपणापासून समाजात सक्रीय असलेले सावता यांचं व्यक्तिमत्त्व विचार, शिस्त, आणि समाजाभिमुख कृती यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे. बालाप्रसाद जेथलीया यांच्यासह सामाजिक उपक्रमांत सहभाग घेणाऱ्या सावता काळे यांच्यावर स्वयंसेवक असताना सुभाष अण्णा अंभुरे, सोपान काका जगताप, अशोकराव मसलकर आणि डॉ.संजय पुरी यांसारख्या अनुभवी समाजसेवकांचे बौद्धिक संस्कार झाले. त्यांनी थोर महापुरुषांचा आदर करत देशभक्ती आणि अध्यात्माचा समतोल आत्मसात केला.
थोर महापुरुषांबद्दलचा आदर आणि त्यांना जीवनात सर्वोच्च स्थानी मानण्याची शिकवण त्यांनी आत्मसात केली व देशभक्ती आणि आध्यात्मिक प्रवृत्ती यांचा समतोल त्यांनी आपल्या आचरणातून दाखवला.
सावता काळे यांचे कार्य हे कुठल्याही विशिष्ट गटा पुरते मर्यादित न राहता सर्व समाज, व्यापारी, मजूर, वंचित वर्ग यांच्याशी जोडलेले आहे. त्यांनी परतूर तालुक्यातील ४७ पेक्षा अधिक गावांमध्ये थेट संपर्क साधत तरुणांना एकत्रित केले. आरती, शोभायात्रा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, यामधून त्यांनी युवकांमध्ये नेतृत्व आणि संस्काराचे बीज पेरले.
समाजात अडचणीत सापडलेल्या अनेक प्रकरणांत त्यांनी पुढाकार घेतला. गतीरोधक नसल्याने झालेल्या अपघाता विरोधात आंदोलन, बंद स्ट्रीट लाईटसाठी पाठपुरावा, स्वच्छतेसाठी शहरात जनजागृती – अशी अनेक प्रबळ उदाहरणं त्यांच्या कार्यातून दिसून येतात.
२०११ मध्ये कॉलेजला शिक्षण घेत असताना काही रोड रोमिओ विरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला. तरीही समाजकार्य न थांबवता अधिक जोमाने समाज हितासाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी केला, बेवारस गोमाता आणि वानरांचा अंत्यविधी, तसेच मुक्या प्राण्यांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करून दिले.
२०१५ साली त्यांनी श्री रामनवमी यात्रा विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून सुरू केली, जी आजतागायत अत्यंत यशस्वीपणे सुरू आहे. परतूर शहराचे ऐतिहासिक “प्रल्हादपूर” नाव ही विविध कार्यक्रमात चर्चेत आणले तसेच तालुक्यातील होणाऱ्या धार्मिक कार्यक्रम व जयंतीमध्ये पूर्णपणे सहभागी होतात. वीर लहुजी वस्ताद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लॉकेट वाटप, आणि बिरसा मुंडा नगर हे नाव देण्यासाठी घेतलेला पुढाकार त्यांचा समाजप्रती असलेला आदर दर्शवतो.
त्यांच्या कार्याची दखल घेत २०१२ साली सामाजिक समन्वय समिती तर्फे दिला जाणारा “समाज रक्षक पुरस्कार” आणि २०२५ साली “महात्मा फुले बालसंगोपन संस्था” तर्फे सामाजिक कार्यासाठी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले. समाजासाठी झिजणारी, संयमी पण प्रसंगी आक्रमक भूमिका घेणारी ही त्यांची ओळख आज पूर्ण जालना जिल्ह्यात रुजलेली आहे,राजकीय प्रवासाची ठाम आणि प्रभावी सुरुवात मागील काही वर्षांपासून सावता सुभाषराव काळे यांनी परतूर तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक ठोस पावलं उचलली. त्यांच्या सातत्यपूर्ण व तळमळीच्या कार्यशैलीमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले, आणि हीच कार्यनिष्ठा मा.आमदार बबनराव लोणीकर साहेबांच्या दृष्टीस पडली.
त्यांच्या कार्याची दखल घेत मा. लोणीकर साहेबांनी सावता काळे यांना सांगितले “तुमचे जे समाजकार्य चालू आहे, त्याला आता भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठा वरुण अधिक प्रभावीपणे दिशा द्या.”
या प्रेरणादायी आणि विश्वासदर्शक आवाहनानंतर, सावता काळे यांनी मा. राहुल भैय्या लोणीकर व भाजपा परतूर तालुका अध्यक्ष शत्रुघ्न भाऊ कणसे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.
त्यांची कार्यक्षमता, संघटन कौशल्य आणि लोकांशी असलेला मजबूत जनसंपर्क पाहता, पक्षाने त्यांच्यावर “तालुका संघटन सरचिटणीस” या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली. हा केवळ पद नियुक्तीचा निर्णय नव्हता, तर त्यांच्या सामाजिक योगदानाची आणि नेतृत्व क्षमतांची झालेली पावती होती आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यासारखा विश्वास दर्शक चेहरा भाजपात येणे म्हणजे सकारात्मक संदेशच.
नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपाच्या तालुका कार्यकारिणीत महाराष्ट्राचे युवा नेते राहुल भैया लोणीकर साहेबांनी मंचावरून सावता काळे यांच्याकडे इशारा करत “नगर परिषद परतूर आपल्याला ताब्यात घ्यायची आहे” असा ठाम निर्धार व्यक्त केला.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!