स्वराज वार्ता प्रतिनिधी लक्ष्मण बिल्होर
सोबतच सीबीएससी पॅटर्न राबवणार असल्यामुळे सर्व पालकांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या पाल्याला शिक्षणासाठी संधी द्यावी
आज सर्वत्र शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जात आहे, विद्यार्थ्यांना पुष्पहार देऊन त्यांचे जंगी स्वागत शाळेमध्ये केले जात आहे त्यामुळे निश्चितच बाल मनाला शिक्षणाची गोडी गोडी लागेल शाळेच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमानिमित्त बोलण्यात आले
विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करण्यासाठी निश्चितच या उपक्रमाचा मोठा फायदा होणार असून या माध्यमातून चिमुकल्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेविषयी प्रेम निर्माण व्हावी व त्या माध्यमातून त्यांना शिक्षणाची गोडी लागावी हा उद्देश आहे
वलखेड ता.परतुर येथील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात आले की आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली पासून CBSC म्हणजे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय या वर्षापासून घेण्यात आलेला आहे तरी गावातील ज्यांची मुले खाजगी संस्था किंवा इतर शाळेमध्ये असतील त्यांनी आपल्या गावातील इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश करावा जेणेकरून सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेऊन केवळ सुक्षितच नव्हे तर विशेष अधिकारी निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक तत्पर असतात.
आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत शिक्षण , मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मोफत बूट आणि सॉक्स, मोफत मध्यान भोजन त्याचप्रमाणे विविध स्पर्धेची तयारी, संस्कृतीक कार्यक्रम, शैक्षणिक सहलीचे आयोजन, क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे तरी पालकांना विनंती करण्यात येते आहे की आपल्या पाल्याचा प्रवेश आपल्याच गावातील शाळेत करावा असे अव्हान वलखेड येथील जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.खवल सर,वावरे सर,पाईकराव सर,ईरले सर, सौ.तनपुरे मॅडम व रुद्रे मॅडम यांच्यावतीने करण्यात आले
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. लक्ष्मण बिल्हारे, उपाध्यक्ष सुनिल सुरुंग, सदस्य भास्कर पाईकराव तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन मा.उपसरपंच श्री.विश्वनाथ सुरुंग, गजानन वटाणे, दत्ताभाऊ अंभुरे(पत्रकार), प्रभाकर सुरुंग, मनेश वटाणे, नामदेव पाईकराव, विश्वनाथ पाईकराव,नारायण मिंड, खंडेराव पाईकराव,राहुल पाईकराव,सुनिल बिल्हारे, दिपक सुरुंग, परमेश्वर बिल्हारे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!