स्वराज्य वार्ता परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण व राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे जालना जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आगामी काळामध्ये जालना जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून विकासात्मक कामे करण्यात यावी असे प्रतिपादन सत्काराच्या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांनी केले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परतुर तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बरकुले, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग कयूम खान , मंठा तालुका अध्यक्ष गणेशराव घारे, भाऊसाहेब गोरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक सरचिटणीस धैर्यशील भैया चव्हाण ,माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती जालना, अजय केंधळे, अर्शद बागवान प्रदेश सचिव यावेळी उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!