स्वराज्य वार्ता अहमद अन्सारी पाथरी
मानवत : दि.2 मे शुक्रवारी रोजी ऑल इंडिया मुस्लिम वक्फ बोर्ड मानवत यांच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रस्तावित वक्फ सुधारणा विधेयकाचा निषेध नोंदवण्यासाठी मानवत येथील माननीय तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी मानवत चे मुस्लिम धर्मगुरू आणि स्थानिक नेते उपस्थित होते. यामध्ये मौलाना मुजाहिद, हाफेज लतीफ, मौलाना असलम, हाफिज अकबर, मौलाना असलम काझी, हाफेज आयाज ,हाफेज अबरार, उमर कुरेशी,यांचा समावेश होता. त्याचबरोबर माजी नगरसेवक रहीम भाई बागवान, नियामत खान, व शगीर खान ,यांनीही सहभाग नोंदवला.
या निवेदनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध नोंदवत, मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान राखावा, अशी मागणी करण्यात आली आहे…
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






