बालकांना आत्मविशवासाचं बळ देणारा “वडाचं झाड ” हा ज्योती बन्सोड यांचा कथासंग्रह

स्वराज्य वार्ता / बबनराव आरख

ज्योती बन्सोड यांचा ‘ वडाचं झाड ‘ हा पहिलाच कथासंग्रह संवेदना प्रकाशन, खापरखेडा, नागपूर द्वारा प्रकाशित झाला. बालकांच्या विश्वात हरवून जाणारं व्यक्तीमत्व ! ज्योती बन्सोड यांनी आपले दिलखुलासपणे मनोगतात कथासंग्रहाच्या बाबतीत लिहतांना म्हटलं की वादळाच्या झोक्यावर झुलणारं, दुःखात खंबीरपणे उभं ठाकणारं, ऊन सावल्यांचा मेळ, स्वप्नांचा खेळ आणि जगण्याची घालमेल, असं सुख दुःखाचं मिलन, वास्तवामध्ये अनुभवलेलं विश्व. त्या अनुभूतीची हृदयात स्कुरलेली उर्मी. त्याच ऊर्जेतून शब्दांकीत होऊन जन्मास आलेल्या अंकुरांना मिळालेले क थांचे स्वरूप म्हणजेच वडाचं झाड ‘ हा कथासंग्रह…

या कथासंग्रहात एकूण एकोणवीस कथांचा समावेश केलेला आहे. कथा वाचतांना कथा किती सहजतेने लिहली जावी; सोपे शब्द तिच्यामध्ये अलंकृत असावे याबाबत कथा अभ्यासका मध्ये मतभेद जरूर असू शकतात. तरीही ती कथा आशय आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत आपलं वेगळेपण सांभाळून असते. विचार प्रगट करतांना ते सद् विचारच असावे, प्रबोधनातून बालमना सोबतच समाजमन संस्कारक्षमपिढी निर्मितीचा वसा घेतलेल्या कथा लेखिकेला आणि आकलनीय प्रतिमा, प्रतिकांचा हव्यास उगीच नसतो. ती आपलं लेखन, चिंतन मुक्तपणे करीत असते.सहज भावनेतून वात्सल्य निर्माण करणाऱ्या साने गुरुजींचा प्रत्यय देणाऱ्या ज्योती बन्सोड यांची कथाशैली सुद्धा अशीच आहे.

या कथासंग्रहातील कथा वाचतांना बालकथेच्या निर्मितीला वेगळेवण देत असतांना बालक व त्याची मानसिकता, त्याचा वयोगट समोर ठेऊन त्त्यांच्या मनातील देव आणि देशाचा विचार क थेच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असणाऱ्या विकारांचा नाश करणाऱ्या असून सोबतच नवचैतन्याची ऊर्जा त्याला अप्रत्यक्षपणे प्राप्तकरून देणाऱ्या आहेत. बालमनाला आकार उकार देत ‘नवामानव ‘ घडविण्याचं साहस कथेच्या माध्यमातून कथा लेखिका ज्योती बन्सोड यांनी केलेलं आहे. एवढचं नव्हेतर सामाजिक दुषणांवर प्रहार करीत ममतेचा लेप लावणारी कथा काळजाला स्पर्श करतांना निदर्शनास येतात. जखमेवर फुंकर घालून मानवी मनास दिलासा देणारी व देशाच रंक्षण करण्याच्या हेतूनं सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणादायी ठरलेली ”कष्टाचं सोनं झालं ” ही कथा आहे. या कथेच्या माध्यमातून पेरलेला विचार साने गुरुजींच्या विचाराची कास धरणारा असल्याचे लक्षात येते.

“वृक्षवल्लीचे रक्षण ” या कथेच्या माध्यमातून तर कथा लेखिका ज्योती बन्सोड यांना आजचा सर्वांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे वृक्ष लागवड व त्याचे संरक्षण मानवी जीवनास किती महत्वाचे आहे. या बाबीवर प्रकाश टाकला असून; जर बालपणीच ही गोष्ट लक्षात आणून दिली तर पुढचा वृक्षतोडीचा प्रश्न आपोआपच सुटण्याला मदत होते. अवती भवतीच्या सर्वच घटकांचा समावेश सकृत आणि विकृत मनोवृत्तीचा चपखलपणे उपयोग आपल्या कथेतून केलेला आहे. आत्मभानबरोबर सामाजिक भान आणि नव्या पिढीला सदविचारांचा संदेश ही कथा असल्याचे वाचकाच्या लक्षात येईल.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आमुष्यभर समाजसेवा केली. आई – बापाचे महत्व कितेते किर्तनाच्या माध्यमातून सांगण्यास प्रयत्न केला. परंतू समाजामध्ये आजमात्र आईवडिलाची होणारी अवहेलना दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. ही बाब लेखिका ज्योती बन्सोड विसरलेल्या नाहीत. कारण वाढते वृद्धाश्रम हे कशाचे लक्षण आहे ? याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आईवडिलाचे महत्व तसेच त्यांची शिकवण आपल्या किती फायद्याची ठरू शकते.अन्यथा किती मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शक ते ही बाब” आज्ञा ” या कथेच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न लेखिकेने केला असून ; बालमनावर ते पडसाद उमटविण्या संपूर्णपण यशस्वी होतील यात तिळमात्र शंका नाही.

जीवन जगत असतांना अनेक चांगल्या वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. विनयशिलतेचे मुल्यशिक्षण देत असतांना विद्यार्थ्यांमध्ये तशा स्वरूपाची जागृती करून नितीमत्तेची महत्व पटवून द्यावे लागते. आपल्या सहज,साध्या कथेतून बालमनाला प्रोत्साहीत करून प्रखर सामाजिक भान ठेवून वाङमयीन मुल्यांच्या निकषावर आशयघन व संस्कारक्षम असलेली कथा “विनयशिलता ” ही खूप काही देऊन जातांना दिसते. एवढेच नव्हे तर व्यापक जीवन मुल्यांचा शोध घेणारी अशी ही कथा आहे.

या कथा संग्रहातील कथा ह्या एकापेक्षा एक सरस आहे. प्रत्येक कथेतून बालमन जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे. खरं तर बालमन किती महत्वाचं आहे. ते सुसंस्कृ त होणं किती गरजेचं आहे ही बाब प्रेत्येक वाचकाच्या लक्षात येईल.जसे ओल्या मातीला आकार द्याल तसे पात्र तयार होईल. मात्र ते सुकल्यानंतर त्यावर कितीही संस्कार केलेतरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. याच अर्थानं “पहिली पायरी ” ही कथा जीवन मुल्यांचा परामर्श घेणारी अशी कथा वाटत राहते. प्रत्येक माणसाचं दुःख, त्याची वेदना, समस्या व आशयगर्भ अनुभव अत्यंत सोप्या सरल पद्धतीने बालमनावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवी मन जपण्याकरीता सर्वश्रेष्ठ मुल्य जपणारी ही कथा आहे. चांगली स्वप्न साकार करण्याचा मुख्य आधार देणारी ही कथा आहे.

आकलनाच्या पातळीवर सहज उमजणाऱ्या’ प्राजक्ता, सूरज, जेलेबी, लाडक्या भोल्या साठी,मी पहिलेला देव माणूस, ह्या व इतर कथांची निर्मिती प्रक्रिया असून उज्वल वाटचाली चा त्या वैभवशाली संकेत ठरतांना दिसत आहे. वर्तमानाच्या चिरंतर पोकळीत घडत जाणाऱ्या घटणा क्रमाच्या भविष्याचे सुसूत्रीकरण करीत संताच्या विचारांचा आधार घेत गतिशिल वळणे घेत नवा विचार देत जीवनाचे चांगले मापदंड ठरवित सामजिक जाणीवांना समृद्ध असा हा कथा संग्रह आहे.प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावा ; असाच हा कथासंग्रह आहे. सार्वजनिक वाचनालयात ठेवावा. ही आग्रही भूमिका ठेवून लेखिका ज्योती बन्सोड यांना पुढील लेखना करीता मन:पूर्वक शुभेच्छा ! या कथांचा हा अथांग प्रवाह असाच गतिमान होवो. ही ईश्वर चरणी प्रार्थना !

 

समिक्षक प्रा.मधुकर वडोदे

‘आई,’ सरस्वती नगर,

सिल्व्हरसिटी, हॉस्पिटल जवळ, खामगाव, जि. बुलढाणा – ४४४ ३०३, मो. ९४२२००००७

 

दिनांक – २४ मार्च २०२५

कथासंग्रह – वडाचं झाड

लेखिका – सौ. ज्योती वामन बन्सोड

प्रकाशक – संवेदना प्रकाशन

खापरखेडा, नागपूर.

मो. 9623 63 9303

मुल्य-१२५ रु. पृष्ठे-८८

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल