स्वराज्य वार्ता / राम राठोड
परतुर / प्रतिनिधी : प्रभू रामचंद्र हे आमच्या आस्थेचा विषय असून, आज रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण परतुर शहरांमध्ये राम नामाचा जयघोष ऐकून मन आनंदित झाले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. ते परतुर येथे आयोजित रामनवमी उत्सव मिरवणुकी च्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की लाखो करोडो हिंदूंची अपेक्षा होती ते आयोध्या मध्ये प्रभू रामचंद्राचे मंदिर व्हावे ते स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्यात उतरवले असून यामुळे संपूर्ण भारत वर्षाला आनंद झाला असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. गेल्या ४० वर्षांमध्ये मी परतूर शहरात एवढी भव्य दिव्य मिरवणूक प्रभू रामचंद्रांची बघितली नसल्याचे सांगतानाच आपले मन या मिरवणुकीमुळे आनंदित असून एकोप्याचा रामनवमी हा उत्सव असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले. पुढे ते म्हणाले की कार सेवक म्हणून आपण स्वतः कार सेवेत सहभाग नोंदवला होता, याचा अभिमान असून गेल्या कित्येक वर्षापासून ची हिंदूंची इच्छा पूर्ण झाली असल्याने संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्साह अतिशय जोरदार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आमच्या जीवनाचा आदर्श असून त्यांच्या आदर्श असून त्यांचे आदर्श जीवन चरित्र रामायणाच्या माध्यमातून त्या सर्वांच्या हृदया हृदयापर्यंत पोहोचलेली असल्याने खऱ्या अर्थाने भारततील जनता संस्कारक्षम असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले. दरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण करत प्रभू रामचंद्राची भव्य दिव्य मिरवणूक सुरू करण्यात आली या मिरवणुकीतील ढोल पथक गोंधळी, पारंपारिक वेशभूषा घातलेले महिला पुरुष भगव्या पताका भगवे ध्वज सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत होते अनेक ठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती तर अनेकांनी आपापल्या घरावरून या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत राम जन्मोत्सव साजरा केला. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, सुभाष अण्णा अंभोरे अर्जुन जगताप, सावता काळे, भगवानराव मोरे दया काटे, शत्रुघन कणसे, संपत टकले रमेश भापकर, सुधाकर सातवणकर प्रवीण सातोणकर, संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे, ओम मोर अमोल अग्रवाल, अमर बगडिया अजित पोरवाल, रंगनाथ येवले, सनी तनपुरे संतोष हिवाळे विजय यादव, विकास बोडखे, गोपी ठाकूर, आनंद कोटीच्या विठ्ठल कुलकर्णी सचिन काटे, राजेंद्र मुंदडा अमोल शहाणे, कैलास चव्हाण प्रमोद राठोड, नरेश कांबळे सोनवा अग्रवाल ज्ञानेश्वर जईद दिगंबर मुजमुले, सनी तनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष भक्तांची उपस्थिती होती.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!