प्रतिनिधी/आष्टी :- परतूर तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.गावातील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा असो की रस्त्यावरील नाल्या सफाई असो की, कचऱ्याच्या साफसफाईचा असो ग्रामस्थांकडून ग्राम प्रशासनास निदर्शनास आणून दिले तरच लक्ष दिले जाते.
ग्रामपंचायतीची मुख्य कार्य म्हणजे गावांतील ग्रामस्थांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे ,सार्वजनिक स्वच्छता ठेवणे,शिक्षण आणि आरोग्य विषयक सुविधा पुरवणे,सांडपाण्याची व्यवस्था करणे,जन्म, मृत्यू आणि विवाह यांची नोंद ठेवणे, गावांतील लहान उद्योगांना शासकीय मदत मिळवून देणे यासाठी राज्य शासनाकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.आष्टी परिसरातील लहान लहान ग्रामपंचायतीत स्वच्छता तर सोडा सोबत गावांतील रस्ते, शुद्ध पिण्याच्या व्यवस्था, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात विशेष महत्त्व दिले जात आहे.आणि आष्टी ग्रामपंचायतीकडून गावांतील स्वच्छता सुद्धा होत नसल्याचे दिसून येते. गावातील साफसफाईसाठी ग्राम प्रशासनाकडे दोन घंटागाड्या उपलब्ध असतांही फक्त नियोजना अभावी त्याचा उपयोग होत नसल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे.सण उत्सवांचा काळात ही ग्राम प्रशासनास आपले कर्तव्य लक्षात राहत नाही.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक शाळांच्या मुलांची प्रभात फेऱी गावांतून काढण्यात येत असते. यावेळी माहाविर चौकात आल्या असता तेथे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे प्रभात फेरीतील मुलांचा मार्ग बदलावा लागला याची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ग्रामपंचायतीला समाज माध्यमांवर ग्रामस्थांकडून मोढ्या प्रमाणावर टोल करण्यात आल्यानंतर ग्राम प्रशासन खडबडून जागे झाले व आज सुट्टीचा दिवस असताना ही त्या ठिकाणीची साफसफाई केली गेली.ऐरवी ग्रामस्थांकडून वारंवार निदर्शनास आणून द्यावे लागते.तरच ग्रामपंचायतीकडून स्वच्छता व नालेसफाई होते.ऐरवी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. नाल्यातील घाण पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने ग्रामांस्थाना रोगराईचा धोका निर्माण होऊ शकतो. याविषयी ग्रामविकास अधिकारी डी बी काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
यापुवीही असाच प्रकार समोर आला होता गावांतून कावढ यात्रा एका ठिकाणाहून जात असताना यात्रेतील भाविकांना नाकाला रुमाल बांधून कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून जावे लागले होते.त्यावेळेस ही ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धती वर ग्रामस्थांकडून नाराजगी व्यक्त करण्यात आली होती.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!