दोन अट्टल गुन्हेगारांना आष्टी पोलिसांनी घातल्या बेड्या

स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी / प्रतिनिधी : परतुर तालुक्यातील आष्टी बाजारपेठ ही नेहमीच गजबजलेली असते. येथील वर्दळीच्या रस्त्यावर कोण काय हेतूने आले आणि गेले हे समजत नाही. गावात आठवडी बाजारात नेहमी मोबाईल चोरी आणि खिसे कापल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड हे आष्टी येथे आल्यापासुन त्यांनी सर्व भुरट्या चोरांना पकडून कायदेशीर कारवाई केली आहे. तेंव्हापासुन मोबाईल चोरी बंद झाली असलीतरी दोघा अट्टल चोरट्यांना आष्टी पोलिसांनी पाठलाग करुन पकडले असून, गावात रेकी करुन त्यांचा मोठा गुन्हा करण्याचा डाव उधळण्यात आला आहे.
गत दोन-तीन दिवसांपासून आष्टी पोलीस अनोळखी माणसांवर पाळत ठेवून होते. त्यांचा पाठलाग करित असताना पोलिसांचा संशय आल्याने ते पसार होण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यापुर्वीच अमोल वैजिनाथ गल्हाटे वय ३०, रा. इंद्रनगर, गारखेडा ता. जि. छत्रपती संभाजीनगर याला परतवाडी शिवारात पकडण्यात आले. तर दुसरा मंगेश वाल्मीक शाहाणे वय १९, रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर याला सरुमगाव शिवारात पाठलाग करुन पकडण्यात आले. हे दोघे अट्टल गुन्हेगार असून, पोलिसांनी खाक्या दखवताच गावात रेकी करुन आम्ही मोठी चोरी करणार असल्याचे त्यांनी कबुल केले आहे. ही कामगिरी साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सचिन चाटे, गोपीनाथ कांदे, रामदास शेळके, विनोद वाघमारे, राना पांढरे, सज्जन काकडे, राहुल वाघमारे, श्री. बांदाळे, ढाकणे, शिंदे यांनी केली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल