जो व्यक्ती आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो जनतेला काय देणार – करुणा मुंडे

स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करुणाताई धनंजय मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार घणाघात

स्वराज्य वार्ता / ओम राऊत

बीड : गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी ‘स्वराज्य शक्ती सेना’ च्या वतीने बीड शहरात श्री मंगलदास अर्बन मल्टिपल निधी लि. गेवराई या बँकेच्या शाखेचा उद्घाटन सोहळा व महिला सशक्तीकरणा करीता या बँकेतुन लवकरच गरजू महिलांना बीनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. हा कार्यक्रम रामकृष्ण लॉन्स बीड येथे सकाळी पार पडला. यावेळी महिलांची गर्दी लक्षणिय होती. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाना साधत स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करुणाताई धनंजय मुंडे म्हणाल्या की जो व्यक्ती आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो जनतेला काय देणार आपले भले बुरे जनतेनेच ठरवावे अशी वेळ आता येऊन ठेपल्याचे त्यांनी सांगितले. बीड शहरात सौ. करुणाताई धनंजय मुंडे यांनी धडाकेबाज कार्यक्रम घेऊन सर्वांनाच अाश्चर्याचा धक्का दिला. आज झालेल्या कार्यक्रमासाठी लातूर, धुळेसह मराठवाड्यातील अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी महिला व पुरूषांच्या प्रचंड गर्दीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी जवळपास ९० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी ‘स्वराज्य शक्ती सेना’ पक्षात प्रवेश केला आहे. शेतकरी भिकेला लागला या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की मी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. करत आहे. आपल्याकडे ज्या विकासाच्या गप्पा केल्या जातात त्या निव्वळ भुलथापा आहेत. परळीत पावसाळ्यात अनेक पुल वाहून गेले. जवळपास सगळ्याच गावातील पुलाची हीच अवस्था आहे. त्यातूनच बोगसगिरी उघड होते. कृषीमंत्र्यांच्या गावातच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. आहे ती पिके सडून गेली. पिक विमा मिळत नाही. शेतकरी भिकेला लागला आहे. त्यांना मदत मिळत नाही. शेतकऱ्यांचे घर उघड्यावर पडले आहे. आता झोपेतून जागे होऊन पिकांची पाहणी केली जात आहे. ही शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा आहे. खर तर …. जी व्यक्ती आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो जनतेला काय देणार? तो बीडच्या युवकांचे काय भविष्य बनवणार? बीडचे काय भले करणार? याचा विचार जनतेने करायचा आहे. तब्बल ३०० कोटींचा महाघोटाळा कृषी विभागात तब्बल ३०० कोटींचा महाघोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट सौ. करुणाताई धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. या घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. हे सगळे थांबवायचे असेल तर येत्या विधानसभे साठी आपण ‘स्वराज्य शक्ती सेना’ चे उमेदवार उभे करणार आहोत. त्यांना निवडून द्या..मी तुम्हाला वचन देते की तुम्हाला जेवढा विकास निधी उपलब्ध होणार आहे तो संपूर्ण विकासासाठी, तुमच्या सेवेसाठीच खर्च केला जाणार आहे. विकास निधी कसा खेचून आणायचा आहे ते मला चांगलेच माहिती आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका. जनतेसाठी मैदानात उतरले एका व्यक्तीसाठी मी आपले सगळे आयुष्य पणाला लावले. घर सांभाळून मी त्यांना मंत्री कसे करता येईल यासाठी झटले. सु:ख दु:खात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. सत्ता , सुख, संपत्ती मिळताच माझे अस्तित्वच नाकारण्यात आले तेव्हा मी माझ्या अधिकारासाठी बंड केले. मला कशाचीही लालसा नाही. मी बाहेर पडले तेव्हा सर्वस्व पणाला लावून जनतेसाठी मैदानात उतरले आणि मला मोठ्या प्रमाणात जनतेचे प्रेम मिळत आहे. मला जनतेने संधी दिली तर मी विश्वास नक्कीच सार्थकी लावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही निवडून दिलेले आमदार हे तुमचे हक्काचे असतील. तुमची सेवा करणारे असतील याचंा विश्वास , असा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देते. महिला स्वाभिमानाने जगू शकतील मी एक स्त्री आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे दु:ख समजू शकते. समाजात जगण्यासाठी, घर चालवण्यासाठी महिलांना काहीतरी व्यवसाय करता यावा, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी आम्ही बिनव्याजी कर्ज योजना घेऊन येत आहोत. त्यामुळे महिलांना कर्ज फेडण्यासाठी भरमसाठ व्याज भरण्याचा धाक राहणार नाही. त्यामुळे महिला स्वाभिमानाने काम करून जगू शकतील. आज महाराष्ट्रात स्त्री सुरक्षित नाही. मुली सुरक्षित नाही. आपल्याला स्वत:ची सुरक्षा स्वत:च करावी लागणार आहे. त्यामुळे जागरूक रहा, सतर्क रहा , आपली एकजूट वाढवा, असेही करूणाई मुंडे म्हणाल्या आहे.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल