पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा, प्रत्येक व्यक्तीच्या मनातला
स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : मौजे.वलखेड ता.परतुर जि.जालना येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. दिनांक:-०५ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल किंवा सामान्यत: समुदायामध्ये त्यांचा सन्मान करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. लक्ष्मण बिल्हारे,मा.उपसरपंच विश्वनाथ सुरुंग,आसाराम सुरुंग,मा.तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधरराव सुरुंग,सुभाषराव सुरुंग, दत्तात्रय अंभुरे,परमेश्वर बिल्हारे, भास्कर पाईकराव,तुळशीदास बिल्हारे दत्ता पाटील सुरुंग व समस्त ग्रामस्थ वलखेड यांच्या वतीने सर्व शिक्षक मुख्याध्यापक- श्री. खवल एस.एस. शिक्षक-श्री . पाईकराव के एस. श्री.इरले व्ही.जी. श्री.वावरे पी. एस. , श्रीमती. तनपुरे ए.एम., श्रीमती. रुद्रे ए. एन. यांचा सत्कार करुण शिक्षक दिन साजरा केला. ०५सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. ते एक उत्तम शिक्षक होते त्यांनी स्वतःचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे सुचवले म्हणूनच त्यांचा जन्म दिन (जयंती) ही भारतात शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाऊ लागली. शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे कारण जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. आम्ही गेल्या तीन वर्षापासुन शिक्षकांचा सत्कार मान सन्मान करुन हा शिक्षक दिन साजरा करत असतो. असेही शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष श्री. लक्ष्मण बिल्हारे म्हणाले व नंतर श्री. पी.एस. वावरे सर यांनी या आगळ्यावेगळ्या शिक्षक दिनाचे कौतुक करुन सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!