स्वराज्य वार्ता / सुनील गायकवाड
आष्टी प्रतिनिधी : आष्टी/ सध्या सोशल मीडियात विशालगड( गजापूर ) प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ दोन्ही बाजूने प्रसारित केला जात असल्याने समाजात अशांतता पसरण्याचा व जातीय तेढ निर्माण होण्याचा संबम आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास, असे आव्हान पोस्ट करतानाच अशा पोस्ट करण्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आष्टी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी दिला आहे. गत काही दिवसात निर्माण झालेल्या स्पोर्टक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना. श्री इंगेवाड पुढे म्हणाले की आपल्या गावात, कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओज, फोटोज शेअर करत नाही आणि जातीय तनावर निर्माण करणारे संदेश सोशल मीडियात प्रसारित करणार नाही. याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, त्यामुळे गावातील शांतता बांधीत राहील तसेच जे कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समाज तेंड निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी आपल्या प्रतिष्ठेला बांधा येणार नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी काळजी घ्यावी.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






